भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. युजवेंद्र चहलने रविवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी)वर ऑस्ट्रेलिया विरोधात खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडियाचा संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. चहलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेण्यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही मागे टाकलं आहे.
चहलने दुसऱ्या टी-20 सामन्यात चार ओव्हर्समध्ये 51 धावा देत एक विकेट घेतला आहे. चहलने घातक दिसणाऱ्या स्टिव स्मिथला आउट करत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले 59 विकेट्स पूर्ण केले आहेत. त्याने 44 सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. तसेच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 50 सामन्यांमध्ये 59 विकेट्स घेतले आहेत. चहल आणि बुमराह दोघेही भारतीय संघाचे स्टार गोलंदाज आहेत. जे अत्यंत अटीतटीच्या वेळी भारतीय संघासाठी गेम चेंजर ठरतात.
إرسال تعليق